राजकारणविकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं...

विकासात्मक संतुलनाच्या आधारावर नवभारत निर्माण हेच भाजपचे स्वप्न : सुजय विखे यांचं वक्तव्य

spot_img

भाजप सरकारच्या गेल्या १० वर्षांच्या काळात कृषीपासून ते प्रत्येक क्षेत्रात भारताचा विकास झाला आहे. संरक्षणाच्या क्षेत्रात जिथे आपण सर्वच आयात करायचो, तिथे आज आपण अनेक देशांना शस्त्रे निर्यात करतो. यापुढील काळात सगळ्यांचा समतोल विकास करत असतांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक विकासाचे संतुलन याच्या आधारावर नवीन भारताचे निर्माण करणे, हेच भाजपचे स्वप्न आहे, असं वक्तव्य नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या तयारीच्या वेळी माध्यमांशी बोलत होते.

ते म्हणाले, ‘भारत आत्मनिर्भर होण्यासाठी, विश्वगुरु होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रयत्न आहेत.
मंगळवारी (दि. ७) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहिल्यानगरीत येणार आहेत. त्यामुळे सर्वच महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाने सर्वच वातावरण ढवळून निघणार आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा अंतिम टप्पा असून आतापर्यंतच्या प्रचारात मतदारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. अनेक छोट्या मोठ्या सामाजिक, राजकीय, सेवाभावी, धार्मिक त्याचबरोबर क्रिडा संघटनांनी समर्थन दिलंय.

महायुतीच्या सर्व घटक पक्षातले पदाधिकारी आणि कार्यक्रर्त्यांनी प्रचाराची धुरा सांभाळत नवी उर्जा दिली. यामुळे विजय केवळ आमचाच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वाचे नेते आहेत. त्यांची लोकप्रियता ही जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. यामुळे नगरकरसुद्धा त्यांच्या सभेची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

विरोधकांनी ज्या भूलधापा देऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. हा डाव पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे हाणून पाडला जाईल. आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रेमात असलेली नगरची जनता व नगरचे वातावरण मोदीमय होऊन जाईल.

मंगळवारी होणारी सभा ही नगरच्या विकासाची पायाभरणी करणारी सभा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच नगरच्या जनतेकडे लक्ष ठेवले आहे. मागील पाच वर्षाच्या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन अनेक विकासाची कामे मार्गी लावली आहेत. यामुळे येणाऱ्या ४ जून रोजी पुन्हा देशात मोदींचे सरकार येणार असल्याने आणि नगरमध्ये महायुतीचा खासदार असल्याने नगरच्या विकासाचा रथ अधिक गतीमान होणार आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न, रोजगाराचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, दळणवळणाची साधने, आरोग्य सुविधा, शिक्षण क्षेत्रातील सुविधा, महिलांच्या सबलिकरणाच्या योजना अशी विविध कामे आता जलद आणि सुलभ होणार’, असे खा. विखे म्हणाले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मिलिंद चवंडके यांना प. पू. योगतज्ञ दादाजी वैशंपायन राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार जाहिर

योगतज्ञ परमपूज्य दादाजी वैशंपायन यांच्या १०५ व्या जयंती उत्सवानिमित्त यावर्षीचा राज्यस्तरीय अध्यात्मिक पुरस्कार नारायण...

बापानंच केला मुलाचा खून ; नेवासे तालुक्यातली खळबळजनक घटना…!

नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या गोधेगाव इथं राहणाऱ्या शिवाजी दादासाहेब जाधव (मयत) याच्या शेती वाटपाच्या...

भारतीय संविधानाला धक्का लावणार नाही, हे ठणकावून सांगा ; राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींकडे व्यक्त केल्या ‘अशा’ सात अपेक्षा…!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा असलेल्या राज ठाकरे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सात...

लाच घेतांना तलाठ्याला रंगेहाथ पकडलं ; महसूल विभागात गोंधळ…!

खरेदी केलेल्या शेतीची रजिस्ट्री करण्यात आल्यानंतर फेरफार पाहण्यासाठी तलाठ्यानं तक्रारदाराला दोन हजार रुपये लाच...