अँन्टी करप्शनराज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच

spot_img

‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.

चंद्रपूर : ‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईने चंद्रपुरात मोठी खळबळ उडाली आहे. अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील (५४), दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे (३४), कार्यालय अधीक्षक अभय बबनराव खताळ (५३) अशी गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

घुग्घुस येथील गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकांनी ‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी नोव्हेंबर २०२३ मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, चंद्रपूर येथे अर्ज सादर केला होता. त्यानंतर अधीक्षक संजय जयसिंगराव पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन माधवराव खारोडे यांनी परवाना देण्यासाठी टाळाटाळ केली. दुय्यम निरीक्षक खारोडे यांनी, बिअर शॉपीचा परवाना मंजूर करून देण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. गोदावरी बार अँड रेस्टॉरंटच्या संचालकाने २५ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार दाखल केली. त्यावरून पडताळणी कारवाई करण्यात आली. आज सापळा रचण्यात आला.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकांसह तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा; बिअर शॉपीच्या परवान्यासाठी घेतली एक लाखाची लाच ‘बिअर शॉपी’च्या नवीन परवान्यासाठी एका लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक, दुय्यम निरीक्षक आणि कार्यालय अधीक्षकांविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील मूळचे कोल्हापूरचे रहिवासी आहेत. ते सध्या सुट्टीवर असून कोल्हापूरला गेले आहेत. त्यांनाही ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक मंजुषा भोसले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार नरेश नन्नावरे, हिवराज नेवारे, संदेश वाघमारे, राकेश जांभुळकर, पुष्पा काचोळे, सतीश सिडाम यांच्या पथकाने केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...