अहमदनगर जिल्ह्यातल्या काही तालुक्यांमध्ये अक्षरशः पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली आहे. अनेक ठिकाणी टँकर सुरू आहेत. शहरातल्या नागरिकांना आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या ग्रामस्थांना पाण्यासाठी प्रचंड अशी पायपीट करावी लागत आहे.
अशा परिस्थितीत ज्या भागात मुळा धरणातून पाटाचं पाणी आलंय, तिथं त्या पाण्याची प्रचंड नासाडी होत आहे. पाण्याच्या या नासाडीकडे नगरचा पाटबंधारे विभाग, संबंधित अधिकारी आणि पाणी वापर संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. पाण्याच्या या नासाडीचं हा व्हिडिओ एक ज्वलंत उदाहरण आहे.