लेटेस्ट न्यूज़ग्रामस्थांनी का दिलाय नेवासे तहसील कार्यालयाच्या दशक्रियाविधीचा इशारा ? काय म्हणताहेत नेवासकर,...

ग्रामस्थांनी का दिलाय नेवासे तहसील कार्यालयाच्या दशक्रियाविधीचा इशारा ? काय म्हणताहेत नेवासकर, घ्या जाणून…!

spot_img

मागील वर्षी 2022 – 23 अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या कपाशी, तूर, बाजरी, मका, फळ बाग या व इतर पिकांचे नुकसान झाले होते. सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामेदेखील करण्यात आले होते. परंतु बिनकामाच्या तहसीलदार महाशयांच्या अनागोंदी आणि भोंगळ कारभारामुळे तालुक्यातल्या बहुतांश शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते, असा आरोप केला जात आहे.

वंचित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम मिळावी, यासाठी जीवन ज्योत फाउंडेशनने वंचित शेतकऱ्यांना सोबत घेऊन दोन वेळेस आंदोलन केलेले आहे. दोन वेळेस आंदोलन केले. तेव्हा कुठे झोपलेल्या कर्तबगार तहसीलदार महाशयांना जाग आली आणि तालुक्यातल्या 22 गावांतील शेतकर्यांचे यादी मध्ये नाव आले. सदर यादीमध्ये शेतकर्यांचे नावे आले. शेतकऱ्यांनी के. वाय. सी करून 25 दिवस उलटून गेले. परंतु नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम खरच मिळणार आहे का, असा मोठा प्रश्न पडला आहे.ये

त्या आठ दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाई रक्कम तहसीलदार महाशयांनी तातडीने संबंधितांच्या बँक खात्यात जमा करून योग्य ते पावले उचलावीत. अन्यथा नाविलाजास्तव प्रशासनाच्या विरोधात जीवन ज्योत फाऊंडेशनच्या वतीने भेंडा येथे सकाळी तहसील कार्यालयाचा दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येईल. त्याच दिवशी तहसील यांचा पिंडदान करुन आंदोलन करण्यात येईल. काही अनुचित प्रकार घडला, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला तर त्याला संबंधित शासकीय यंत्रणा आणि त्या विभागातील अधिकारी सर्वस्वी जबाबदार राहतील, असं निवेदन नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आणि तहसील कार्यालयात देण्यात आलं आहे.

 यावेळी शेतकरी जनआंदोलक कमलेश नवले, छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर, आप्पासाहेब आरगडे, जैद शेख, अक्षय बोधक, प्रदीप आरगडे, राहुल कांगुणे, अक्षय आरगडे, अभिजीत बोधक, प्रकाश मुळक, प्रदीप जाधव, बाबासाहेब चामुटे, संभाजी आरगडे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

वडेट्टीवार, अजमल कसाबच्या कुटुंबियांच्या पालनपोषणाची जबाबदारी घ्या : भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य …!

'स्वार्थी राजकारणासाठी काही नेते इतक्या नीच पातळीला जात आहेत, की ते देशाशी गद्दारी करत...

तुमच्या नातवाला अभिमान वाटेल असं काम करा : असं का म्हणाले असतील भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे?

'येणाऱ्या 2047 मध्ये तुमच्या घरातला अठरा वर्षे पूर्ण झालेल्या नातू ज्यावेळेस तुम्हाला विचारील, 'बाबा...

शरद पवार तर वस्ताद आणि वस्ताद एक डाव राखून ठेवतोच ; कोणाच्याही दहशतीला बळी पडू नका : आमदार रोहित पवार यांचं आवाहन

'महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक पैलवान आहेत. त्या पैलवानांचा एक वस्ताद असतो. हा वस्ताद नेहमी एक...

देशात सर्व धर्मांचं ऐक्य टिकायला हवं : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे वक्तव्य

'या देशाला शांतीचा संदेश महात्मा गांधींनी दिला, अहमदनगरच्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषींनी दिला. अहमदनगर (अहिल्यानगर)...