राजकारणलोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार 500 उमेदवार ; संभाव्य अहिल्यादेवीनगरमध्ये (सध्याचं अहमदनगर) सकल...

लोकसभेच्या निवडणुकीत उभे राहणार 500 उमेदवार ; संभाव्य अहिल्यादेवीनगरमध्ये (सध्याचं अहमदनगर) सकल मराठा समाजाचा झाला निर्णय…!

spot_img

महापालिकेचे प्रशासक डॉ. पंकज जावळे यांनी महासभेत नामांतराच्या मंजुरीनुसार अस्तित्वात येणाऱ्या संभाव्य अहिल्यादेवीनगर (सध्याचं अहमदनगर) जिल्ह्यात सकल मराठा समाजाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत महत्वाचा निर्णय घेतला गेला. तो म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातल्या प्रत्येक गावांतून दोन उमेदवार उभे केले जाणार आहेत. अहिल्यादेवी नगरमध्ये या निवडणुकीत तब्बल 500 उमेदवार उभे केले जाणार आहेत.

दरम्यान, बीड जिल्ह्यात लोकसभेच्या निवडणुकीत 2 हजार 534 उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. सरकारनं दिलेली एसईबीसी सवलत मराठा समाजाचे नेते ‘संघर्ष योद्धा’ मनोज जरांगे पाटील यांनी लाथाडून लावली. त्यानंतर त्यांची एस.आय.टी. चौकशी करण्यात येणार असल्याचा निर्णय सरकारनं घेतला आणि त्या निर्णयाला विधानसभेच्या अध्यक्षांनी मंजुरीदेखील दिली.

या निर्णयामुळे मराठा समाजात साहजिकच असंतोष पसरला. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारला धडा शिकविण्यासाठी लोकसभा निवडणुकीत सकल मराठा समाजानं प्रत्येक गावातून दोन उमेदवार लढविण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये या निवडणुकीत तब्बल 5 हजार उमेदवार उभे करण्यात येणार आहेत. राजकीय व्यासपिठांवर मराठे जाणार नाहीत, जरांगे पाटील जो निर्णय घेतील, तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा, असा ठरावही सकल मराठा समाजाच्या या बैठकीत घेण्यात आला.

… म्हणून सकल मराठा समाजाचा हा निर्णय…!

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे हजारो उमेदवार उभे करायचे. यामुळे ईव्हीएम मशिन्स अपुऱ्या पडतील. सरकारची दमछाक होईल. यामुळे राज्यात आणि देशात सरकार स्थापन होऊ शकणार नाही. सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट होईल. हे व्हावं, म्हणूनच सकल मराठा समाजानं हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...