राजकारणसंविधानाचं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात ; आंबेडकरी चळवळीची मतं...

संविधानाचं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच करु शकतात ; आंबेडकरी चळवळीची मतं निर्णायक : आरपीआय कवाडे गटाचे सुमेध गायकवाड यांचा विश्वास…!

spot_img

कॉंग्रेस पक्षानं सर्वाधिक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपमानित केलंय. या अपमानाचा बदला म्हणूनच आरपीआय कवाडे गटाने महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. संविधानाचं रक्षण फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनच होऊ शकेल, हा संदेश कार्यकर्ते देत असून आंबेडकरी चळवळीची मतं नगर दक्षिण मतदारसंघात महायुतीकरिता निर्णायक ठरतील, असा विश्वास आरपीआय कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी व्यक्त केलाय.

पक्षाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत बोलताना गायकवाड म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाशी युती केली. राज्यात महायुतीचे उमेदवार निवडुण आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते सक्रियेतेने काम करत असल्याचं त्यांनी सांगितले.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली. देशातील सर्व घटकांना विविध योजनांच्या माध्यामातून सामाजिक सुरक्षा देण्याचे काम झाले आहे. देशाची प्रगती संरक्षण आणि अधिक विकास मोदींच्या नेृत्वाखालीच होऊ शकतो, हा विश्वास सर्वसामान्य मतदारांच्या मनामध्ये आहे.

नगरच्या विकासासाठी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात मेहनत घेतली, भविष्यात हाच विकास पुढे घेवून जाण्यासाठी त्यांना निवडूण आणण्याची भूमिका प्रचाराच्या माध्यमातून मतदारांच्या पुढे मांडत आहोत. याला समाजातील सर्व घटकांचे समर्थन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

संविधान बचावाचा कॉंग्रेसचा केवळ कांगावा करत असून, याच कॉंग्रेसने डॉ. आंबेडकरांचा पराभव करून त्यांना अपमानित केले होते. या अपमानाचा बदला आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. राज्यातील महायुती सरकारने लंडन येथील बाबासाहेबांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून जाहीर केले.

इंदू मिल येथे स्मारक उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे महायुती सरकारच आंबेडकरी चळवळीला न्याय मिळवून देऊ शकते, ही भूमिका पटल्यामुळेच महायुतीबरोबर जाऊन काम करण्याचा निर्णय प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी घेतला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

या प्रसंगी संपर्क प्रमुख नितीन कसबेकर, जिल्हा सरचिटणीस महेश भोसले, जिल्हा उपाध्यक्ष नितीन साळवे, महिला जिल्हा अध्यक्षा गौतमी भिंगारदिवे, जेष्ठ नेते सुरेश भिंगारदिवे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकवाड, सांरग पटेकर, शाहिद शेख, संजय साळवे, शहर अध्यक्ष किरण जाधव, महेंद्र साळवे, विलास गजभिव आदी उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...