राजकारणतुम्ही खुशाल एकटेच उमेदवार जाहीर करताय? अशा पध्दतीनं आघाड्या चालतात का? 'वंचित'चे...

तुम्ही खुशाल एकटेच उमेदवार जाहीर करताय? अशा पध्दतीनं आघाड्या चालतात का? ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर भडकले…!

spot_img

राष्ट्रवादी काँग्रेसनं (शरद पवार गट) बारामतीतून सुप्रिया सुळे यांची लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. तर शिवसेनेनं (उध्दव ठाकरे गट) उत्तर – पश्चिम मुंबईतून अमोल किर्तीकर यांची उमेदवारी जाहीर केली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर चांगलेच भडकले असल्याचं काल (दि. ११) पहायला मिळालं. खुशाल एकटेच उमेदवार जाहीर करत आहात, हे तुम्हाला मान्य आहे का? अशा पध्दतीनं आघाड्या चालतात का, असे प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केले.

वंचित बहुजन समाज पक्षाचे नेते आंबेडकर यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे गट) नेतृत्वावर प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे, की ‘तुम्ही आम्हाला सर्व चर्चा आणि बैठकांपासून बाजूला ठेवत आहात. चर्चा करून तरी लोकसभा निवडणुकीतला उमेदवार जाहीर करा. आम्ही अशी आशा करतो, की सर्वजण एकत्र बसून या मुद्द्यावर समाधान निघेल आम्ही आजही अधोरेखित करतो, की महाविकास आघाडी बद्दल आम्ही आजही सकारात्मक आहोत’.

दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाने उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकर यांचे उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसचे संजय निरुपम नाराज झाले आहेत. निरुपम हे शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. कीर्तीकर यांच्या उमेदवारीवरून निरुपम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरदेखील आरोप केले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

… तर 2029 मध्ये देशाच्या पंतप्रधानपदी असतील ‘देवेंद्र गंगाधर फडणवीस’. पण…!

महाराष्ट्रातले ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर यांच्या मतानुसार या लोकसभेच्या निकालानंतर राज्याचे...

मोबाईल दिला नाही म्हणून जामखेड तालुक्यातील तरूण मुलाने संपवले जीवन

जामखेड (प्रतिनिधी - नासीर पठाण ) जामखेड - सध्या अनेक विद्यार्थी मोबाईल च्या आहारी गेलेले...

नगरच्या जलतरण तलावात पोहणाऱ्यांची होतेय आर्थिक लूट; 50 रुपयांऐवजी शंभर रुपये घेतल्याचा होतोय आरोप…!

अहिल्यानगरच्या वाडिया पार्क परिसरात असलेल्या जलतरण तलावात पोहायला येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. उन्हामुळे...