लेटेस्ट न्यूज़पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे...

पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी आहे तिहेरी ‘स्ट्राँग’ सुरक्षा ; कुठं? अहो, वाचा की मग सविस्तर…!

spot_img

लोकसभा निवडणुकीसाठी 13 मे रोजी नगर आणि शिर्डी मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर प्रशासनानं ईव्हीएम मशीन्स एमआयडीसीच्या शासकीय गोडाऊनमध्ये सुरक्षितपणे नेऊन ठेवल्या. त्याठिकाणी पोलीस, एस. आर. पी. एफ. आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे जवान अशी तिहेरी ‘स्ट्रॉंग’ सुरक्षा ठेवण्यात आली आहे.

नगरमध्ये अनेक मतदान केंद्रांवर (दि. 13) रात्री आठ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती. सोमवारी (दि. १३) रात्री उशिरा सर्व ईव्हीएम मशीन्स एमआयडीसी परिसरातल्या शासकीय गोडाऊनमध्ये आणून ठेवण्यात आल्या. प्रशासनाकडून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत काटेकोरपणे काळजी घेतली जात आहे.

एमआयडीसी परिसरात शासकीय गोडाऊन आणि परिसरात राजपत्रित अधिकाऱ्यांची टीम आठ तासांच्या शिफ्टमध्ये स्ट्रॉंग रूमला भेट देणार आहे. त्याठिकाणी स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांसह केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान आणि एस आर पी एफ ची तुकडी तैनात करण्यात आली आहे. 4 जूनपर्यंत या परिसरात असा तगडा बंदोबस्त राहणार आहे.

तीन स्ट्रॉंग रुम्स आणि दोन मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी 80 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातल्या ईव्हीएम मशीन्स तीन स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. स्ट्रॉंग रूमची सुरक्षा व्यवस्था पाण्यासाठी वेबकास्टिंगची सोय करण्यात आली आहे. या वेबकास्टिंगच्या माध्यमातून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर लावण्यात आलेल्या स्क्रीनवर उमेदवारांच्या प्रतिनिधींना सुरक्षा व्यवस्थेची खातरजमा करता येणार आहे. निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांचं या सुरक्षा व्यवस्थेकडे विशेष लक्ष आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बार्टीच्या पुस्तक खरेदी घोटाळ्याची चौकशी करा शिवशाही व्यापारी संघटनेची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सामाजिक न्याय मंत्र्याकडे मागणी

बार्टीच्या पुस्तक खरेदी घोटाळ्याची चौकशी करा शिवशाही व्यापारी संघटनेची मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व सामाजिक...

महापालिका उपायुक्त ७ लाख रुपयांची लाच प्रकरणी एसीबी च्या जाळ्यात

महापालिका उपायुक्त ७ लाख रुपयांची लाच प्रकरणी एसीबी च्या जाळ्यात सांगली - सात लाख रुपयांची...

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...