राजकारणतृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरं, दुकानं आणि शाळा जाळल्या ; भाजपचे...

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरं, दुकानं आणि शाळा जाळल्या ; भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतलाय पक्ष कार्यालयातच आश्रय …!

spot_img

लोकसभेची निवडणूक होऊन निकालही जाहीर झाला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवडदेखील झाली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचीही निवड करण्यात आली. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. एवढं सारं होऊनदेखील बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसकडून अत्याचार सुरुच आहेत.

तृणमूल काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांची घरे, दुकान आणि शाळा जाळून टाकत आहेत. या सर्व अत्याचाराला कंटाळून स्वसंरक्षणार्थ भाजपच्या या कार्यकर्त्यांनी कुटुंबासह कोलकाता शहरातल्या मुरलीधर रोड परिसरात असलेल्या भाजप कार्यालयात आश्रय घेतला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या अत्याचारापासून आम्हाला वाचवावं, असं साकडं 170 भाजप कार्यकर्त्यांनी घातलं आहे.

भारत देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूक होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राग अजूनही गेलेला आहे. या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर अमानुष असे अत्याचार सुरु आहेत. या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी 10 जूनपासून भाजपच्या कार्यालयात आश्रय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात हल्ले करत आहेत. भाजपचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये अनेक जिल्ह्यात हिंसाचार होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी म्हटलंय, की ‘भाजप स्वतःच्या लोकांना कार्यकर्त्यांवर हल्ले करायला लावत आहे. लोकसभा निवडणूक जनतेनं भाजपच्या विरोधात निकाल दिला आहे. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडून हिंसाचाराचा अवलंब होत आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या कामगारांना कंत्राटदाराने नुकसान भरपाई देण्याचे मा.कामगार न्यायालयाचे आदेश..! मावळा प्रतिष्ठानचे श्री.निलेश म्हसे पा.यांनी केला पाठपुरावा…

अहिल्यानगर महानगर पालिकेच्या कचरा संकलन ठेकेदार मे.स्वयंभू ट्रान्सपोर्ट च्या चार कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने प्रत्येकी...

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव!

शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांत आता संघटित गुन्हेगारीचा शिरकाव! अहिल्यानगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील शिक्षण विभागात...

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प:

बांधकाम व पाडकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महानगरपालिकेने उभारला सी अँड डी वेस्ट ट्रिटमेंट प्रकल्प: सावेडीतील...

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे!

पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश ; बुधवारपासून टप्प्याटप्प्याने नालेसफाई सुरू करण्याचे नियोजन : आयुक्त...