राजकारणतृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरं, दुकानं आणि शाळा जाळल्या ; भाजपचे...

तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांची घरं, दुकानं आणि शाळा जाळल्या ; भाजपचे शेकडो कार्यकर्त्यांनी घेतलाय पक्ष कार्यालयातच आश्रय …!

spot_img

लोकसभेची निवडणूक होऊन निकालही जाहीर झाला. देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची निवडदेखील झाली. केंद्रीय गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचीही निवड करण्यात आली. केंद्रीय कॅबिनेट मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं. एवढं सारं होऊनदेखील बंगालमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांवर तृणमूल काँग्रेसकडून अत्याचार सुरुच आहेत.

तृणमूल काँग्रेसचे गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते भाजपच्या कार्यकर्त्यांची घरे, दुकान आणि शाळा जाळून टाकत आहेत. या सर्व अत्याचाराला कंटाळून स्वसंरक्षणार्थ भाजपच्या या कार्यकर्त्यांनी कुटुंबासह कोलकाता शहरातल्या मुरलीधर रोड परिसरात असलेल्या भाजप कार्यालयात आश्रय घेतला आहे.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तृणमूल काँग्रेस कार्यकर्त्यांच्या या अत्याचारापासून आम्हाला वाचवावं, असं साकडं 170 भाजप कार्यकर्त्यांनी घातलं आहे.

भारत देशात कायदा अस्तित्वात आहे की नाही, हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणूक होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. मात्र तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा राग अजूनही गेलेला आहे. या कार्यकर्त्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांवर अमानुष असे अत्याचार सुरु आहेत. या अत्याचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी 10 जूनपासून भाजपच्या कार्यालयात आश्रय घेतला आहे.

तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात हल्ले करत आहेत. भाजपचे विरोधी पक्ष नेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये अनेक जिल्ह्यात हिंसाचार होत आहे.

दरम्यान, यासंदर्भात तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अरुप चक्रवर्ती यांनी म्हटलंय, की ‘भाजप स्वतःच्या लोकांना कार्यकर्त्यांवर हल्ले करायला लावत आहे. लोकसभा निवडणूक जनतेनं भाजपच्या विरोधात निकाल दिला आहे. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपकडून हिंसाचाराचा अवलंब होत आहे’.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम…!

अहिल्या नगर जिल्हा परिषदेत प्रशासनाची मनमानी; पात्र ठेकेदार कंपनीला डावलून अपात्र कंपनीला दिलं काम...! महासत्ता...

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना (आदिवासी विकास विभाग) तसेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार; मंत्रिमंडळ निर्णय

अजित केसराळीकरांच्या मागणीला आले यश…. मंगळवार, दि. ३ जून २०२५ रोजी मंत्रिमंडळ निर्णय महाराष्ट्र राज्य अनुसूचित...

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण…  नूतन धम्मविहाराचे उद्घाटन मंगलमय वातावरणात संपन्न..!

तब्बल ३३ वर्षांनंतर आमदार अमित गोरखे यांच्या निधीतून पिंपरी-भाटनागर येथील बौद्ध विहाराचे सुशोभीकरण...  नूतन...

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद… आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह 5 घरफोडीच्या गुन्हयांची उकल!

2 दरोडे व 4 घरफोडीच्या गुन्हयात फरार आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद... आरोपीकडून 1,19,000/-रू किं.मुद्देमालासह...