आरक्षणासाठी मराठा समाजातल्या कोणीही आत्महत्या करु नका, असं आवाहन करत ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं जे आंदोलन सुरू आहे, ते सरकार पुरस्कृत आहे, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. दरम्यान, आरक्षण घेतल्याशिवाय आपण आंदोलन सोडणार नाही, असा निर्धारदेखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलाय.
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सातत्याने उपोषण करणारे मनोज जरांगे यांच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या उपचारादरम्यान काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी जरांगे यांची भेट घेतली असता त्यांनी हा आरोप केला.
जरांगे म्हणाले, ‘सरकार जनतेला वेड्यात काढत आहे. ओबीसी आंदोलन सरकारकडूनच पुरस्कृत केले जात आहे. अचानक असं आंदोलन का घडून येतं, असा प्रश्न उपस्थित करत यामागे सरकारच असल्याचा पुनरुचार जरांगे यांनी यावेळी बोलताना केला.