सर्व विद्यापिठांत कुराणचा अभ्यास अनिवार्य ! पाक सरकारचा ठराव !
पाकिस्तानमध्ये खायचे वांदे झाले आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठी पाकच्या नागरिकांना वाहनांमागे पळावं लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंसह पेट्रोल डिझेलच्या किंमती पाकिस्तानमध्ये गगनाला भिडल्या आहेत. मात्र अशा संकटकालीन परिस्थितीतही पाक सरकार इतर धर्मियांचा मानसिक छळ करण्याची संधी काही केल्या तयार होत नाही.
पाक सरकारनं एक ठराव संमत केलाय. या ठरावानुसार पाकिस्तानच्या सर्व विद्यापिठांमध्ये कुराण या इस्लाम धर्मग्रंथाचा अभ्यास अनिवार्य करण्यात आला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानात वास्तव्य करत असलेल्या हिंदू, ख्रिश्चन आदी धर्मियांना सक्तीनं कुराणचा अभ्यास करावा लागणार आहे.
पाकिस्तानातील सर्व विद्यापीठांमध्ये कुराण अनिवार्य करण्यात आले आहे. याबाबत संसदेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावानंतर विद्यापीठांमध्ये कुराण भाषांतरासह शिकवले जाईल. सर्व विद्यार्थ्यांनी ते वाचावे. कुराणचा अभ्यास केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यासाठी कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही, तसेच विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणही मिळणार नाहीत.
गुण न देणे आणि परीक्षेत सूट देण्याचा उद्देश विद्यार्थ्यांना कुराणसाठी प्रेरित करणे हा आहे. बिगर मुस्लिम अल्पसंख्याक हिंदू आणि इतर समाजातील लोकांनाही कुराण वाचावे लागणार आहे. पाकिस्तानच्या संसदेत वरिष्ठ सभागृहाने आणखी एक ठराव मंजूर केला आहे.
या प्रस्तावानंतर विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पैगंबर मोहम्मदविषयी सांगितले जाईल. हे दोन्ही प्रस्ताव जमात-ए-इस्लामीचे खासदार मुश्ताक अहमद यांच्या वतीने मांडण्यात आले होते. हे दोन्ही प्रस्ताव नियम लक्षात घेऊन मांडण्यात आल्याचे मुश्ताक यांचे म्हणणे आहे. त्याचवेळी त्यांनी ट्रान्सजेंडरशी संबंधित विधेयकाला विरोध केला. हे कुराणच्या विरोधात असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, ‘कुराणातल्या कोणत्या गोष्टी योग्य आणि कोणत्या चुकीच्या आहेत हे लोकांना कळले पाहिजे. लोकांना योग्य आणि चुकीची समज असणे खूप महत्वाचे आहे आणि म्हणूनच कुराण वाचले पाहिजे आणि जाणून घेतले पाहिजे.
नुकतेच पाकिस्तानचे गृहमंत्री राणा सनाउल्लाह यांनी विधान केलं होतं, की सरकारनं मूळ कुराणातला काही श्लोक पुन्हा संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्याकांवर अत्याचार वाढत आहेत. हिंदू मुलींचे अपहरण, बळजबरीने धर्मांतर आणि विवाहाच्या घटनांवर संयुक्त राष्ट्राने चिंता व्यक्त केली आहे. ख्रिश्चन समाजातील मुली आणि महिलांची अवस्था बिकट झाली आहे.
एका अहवालात असा दावा करण्यात आला आहे की, 2019 ते 2022 या कालावधीत ख्रिश्चन समुदायातील मुली आणि महिलांचे जबरदस्तीने धर्मांतर, बालविवाह, अपहरणाची 100 प्रकरणे समोर आली आहेत.
पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. जागतिक बँकेनेही पाकिस्तानच्या वाईट स्थितीवर शिक्कामोर्तब केले आहे. ती आता दक्षिण आशियातील सर्वात कमकुवत अर्थव्यवस्था आहे.