पालकांच्या हाती मुलांचे भविष्य! मोबाईलच्या अतिवापराने होतील ‘हे’ गंभीर आजार
अनेकांना झोपताना, उठल्यावर, काम करताना, जेवताना सतत मोबाईल जवळ बाळगण्याची सवय जडली आहे. पण, काहीकाळ मोबाईलपासून दूर राहणं शरीर आणि मनासाठी खूप गरजेचे आहे.
मोबाईल फक्त गरजेची गोष्ट राहिली नसून अनेकांचे व्यसन देखील झाले आहे. लहानपणापासून मुलांना मोबाईलची सवय लागत असून, त्यावर पालकांनी वेळीच आवर घालणे काळाची गरज बनली आहे. अनेकदा मोबाईलमुळे लहान मुलांना अनेक आजार होण्याची शक्यता असल्याचे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
मोबाईल अतिवापरामुळे मुलांना होतील ‘हे’ आजार – बोटे, हात, पाठ, मानदुखी, थकवा, ताण वाढू शकतो.
निद्रादोषातून कमकुवत होईल मुलाची बौद्धिक क्षमता कमकुवत पडू शकते.
मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. कॉर्टिसोल हार्मोनची पातळी कमी होते.
आरोग्यतज्ज्ञ म्हणतात…
मोबाईल बेडरूमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करा; रात्री फोनचे इंटरनेट बंद करून झोपा.
मुलांना मोबाईलचे आमिष दाखवू नका; मुलांना मैदानी खेळ खेळू द्या.