नवीन वर्षातही महागाई आपल्या मानगुटीवर बसणार !
आरबीआयच्या चलनवाढीच्या नियोजनाअभावी अर्थव्यवस्था सुस्तावण्याची शक्यता !
नवीन वर्ष २०२३ मध्ये शेअर बाजार २०२२ प्रमाणेच राहिल का? २०२३ हे तेजीचे वर्ष किंवा घसरणीचे वर्ष किंवा रेंज बाउंड राहील? हे गोल्ड किंवा डेट फंडासाठी आकर्षक वर्ष असू शकते का? या आणि अशा अन्य प्रश्नांची उत्तरं भविष्यकाळच देऊ शकेल.
पण तज्ज्ञांच्या मते २०२३ हे वर्ष संपूर्ण इक्विटी मार्केटसाठी काहीसे कमकुवत राहण्याची शक्यता आहे. आपण जगभरातील महागाई पाहत आहोत, जी किमान पुढील ६ ते १२ महिन्यांपर्यंत असू शकते. इतर जगाच्या तुलनेत भारतावर कमी परिणाम होऊ शकतो. परंतू काही क्षेत्रांमध्ये मंदी येऊ शकते.
आरबीआयने वेळीच आवश्यक पावले उचलली नाहीत तर मंदी इतर क्षेत्रातही पसरू शकते. चलनवाढ रोखण्यासाठी आरबीआय व्याजदरात आणखी वाढ करू शकते. यामुळे अर्थव्यवस्थेत सुस्ती येईल. त्यामुळे नवीन वर्ष हे डेट आणि सोने / चांदीमध्ये गुंतवणुकीसाठी उत्तम वर्ष ठरू शकते.
गुंतवणुकीसाठी ही श्रेणी गेल्या काही वर्षांत लोकप्रिय श्रेणी म्हणून उदयास आली आहे. वाढत्या व्याजदरामुळे तुम्ही तुमचे पैसे पुढील ५-१० वर्षांसाठी लॉक करू शकता. या फंडमध्ये क्रेडिट जोखीम खूप कमी आहे.
फिक्स्ड इनकम प्लान हा प्लॅन काही वर्षांपूर्वी खूप लोकप्रिय होता. आता गुंतवणुकदार त्याकडे पुन्हा आकर्षित होत आहेत. हा प्लॅन बँकेच्या मुदत ठेवीच्या तुलनेत अंदाजे जास्त परतावा देत आहे. येथे मुख्यतः वाणिज्य पत्रांमध्ये गुंतवणूक केली जाते. येथे इंडेक्सेशन बेनिफिटसह चांगला परतावा मिळू शकतो.
नवीन वर्षात परकीय संस्थात्मक गुंतवणुकदारांकडून नवीन गुंतवणुकीचा ओघ वाढू शकतो. तसेच, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये १५ टक्के अतिरिक्त ESI फंड गुंतवण्याची परवानगी देण्याच्या नवीन आदेशामुळे या फंडात चांगला परतावा मिळण्याची संधी मिळू शकतो.
आरबीआयच्या संकेतांनुसार मार्च महिन्यात भारतातले व्याजदर उच्च स्थरावर असू शकतात. त्यामुळे जास्त भांडवली नफ्यासाठी दीर्घ मुदतीच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे चांगला पर्याय ठरू शकतो.
दरम्यान, वर्ष २०२२ मध्ये जगभरात अशा अनेक घटना घडल्या ज्याचा आर्थिक आणि भू-राजकीय पातळीवर नकारात्मक परिणाम झाला. रशिया-युक्रेन युद्ध, महागाई, मंदीची शक्यता आणि कोरोना महामारी या काही घटना बाजारासाठी नकारात्मक ठरल्या. पण त्यांचा तुलनेने कमी परिणाम भारतीय बाजारांवर झाला आहे.
या नकारात्मक घडामोडींमुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आणि त्याचा फायदा भारतीय बाजाराला झाला. वर्ष २०२२ च्या सुरुवातीला जगातील इक्विटी निर्देशांक नवीन उंचीला स्पर्श करत होते, पण ते त्या पातळीवर टिकू शकले नाही. भारतीय शेअर बाजारही १५ टक्क्यांनी घसरला, पण त्यानंतर सावरला आणि नवीन सर्वकालीन उच्चांक नोंदवला.
वर्ष २०२२ मध्ये आलेला मोठा बदल म्हणजे गेल्या २० महिन्यांत परकिय संस्थात्मक गुंतवणारांनी २२ बिलियन डॉलरची विक्री करूनही भारतीय बाजार स्थिर राहिला. अनेक दशकांपासून परकिय संस्थात्मक गुंतवणुकदार आपला परकीय चलन साठा आणि शेअर बाजाराची चाल निश्चित करत आहे. मात्र आता हा दुवा कमकुवत होत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय किरकोळ गुंतवणूकदार त्यांच्या बचतीचा मोठा भाग म्युच्युअल फंडांच्या माध्यमातून शेअर्स आणि इक्विटी मार्केटमध्ये टाकत आहेत. याशिवाय ईपीएफओ त्याच्या १५ टक्के निधी बाजारात गुंतवत आहे. यामुळे भारतीय बाजारपेठेला आवश्यक स्थिरता प्राप्त झाली आहे.