छत्रपतींसाठी कोणतंही पद किंवा खुर्चीचं महत्व केवळ शून्यच !खासदार डाॅ. कोल्हेंचं वक्तव्य !

spot_img

छत्रपतींसाठी कोणतंही पद किंवा खुर्चीचं महत्व केवळ शून्यच !खासदार डाॅ. कोल्हेंचं वक्तव्य !

 

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना अकारण रोजच्या राजकारणात ओढू नका, अशी हात जोडून विनंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यासाठी कोणतंही पद, कोणतीही खुर्ची, कोणतंही राजकारण नाही. त्यांच्यासाठी हे सगळं शून्य आहे, असं वक्तव्य खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी केलंय.

 

ते म्हणाले, उर्फी जावेदसारख्या प्रकरणांना हवा दिली जाते. त्यामुळं मुलभूत प्रश्न बाजूला राहतात. बेरोजगारी, महागाई, महिला सुरक्षा या महत्त्वाच्या प्रश्नांना बाजूला ठेऊन आपण यावरच बोलत आहोत.

 

तरुणांना आपण मुलभूत प्रश्नांपासून बाजूला केलं तर तो मेंढरांचा कळप तयार होऊ शकतो, अशी भिती खासदार कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज यांची कोणाशीही तुलना होत नाही, होऊ शकणार नाही. तशी तुलना करण्याचा कोणी प्रयत्नदेखील करु नये, असं सगळ्या शिवभक्तांचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वितीय राजे होते.

 

माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहचता येते, याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होतं, असं खासदार अमोल कोल्हे यांनी सांगितलं.

 

मध्यंतरी एका मंत्र्यानं त्यांच्या नेत्याची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली होती. जाणता राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं कोणी म्हणतं असेल, तर प्रत्येकाचाच त्याला विरोध असेल. माझाचं काय स्वतः शरद पवार हेही या गोष्टीला विरोध करतील.

 

सर्व व्यवस्थेची माहिती असलेलं नेतृत्व या भावनेनं म्हटलं असेल किंवा सर्व गोष्टींची जाण असणं, माहिती असणं हे कुणालाही वाईट नाही. असंही अमोल कोल्हे म्हणाले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :