औरंगाबादच्या पोलीस भरतीत 39 ; इच्छुकांची संख्या 5 हजार !

spot_img

औरंगाबादच्या पोलीस भरतीत 39 ; इच्छुकांची संख्या 5 हजार !

 

औरंगाबादमध्ये सुरु असलेल्या पोलीस शिपाई भरतीमध्ये Police Constable Recruitment 39 जागांसाठी तब्बल 5 हजार पेक्षा जास्त उमेदवारी अर्ज आले आहेत. 4 वर्षांनी ही भरती होत असल्याने तरुणांची मोठी गर्दी झाली आहे.

 

यातही कहर म्हणजे या बेरोजगारांच्या (Unemployed) गर्दीत पोलीस शिपाई होण्यासाठी डॉक्टर (Doctor), इंजिनिअर (Engineer), अगदी एमबीए (MBA) झालेले तरुणही आहेत. यावरुन बेरोजगारीचं भीषण वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय.

 

महाराष्ट्राच्या विविध भागातून हजारो तरुण पोलीस भरतीसाठी औरंगाबादमध्ये आले आहेत. नांदेडचा आदित्य फाळके इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधून (Electrical Engineering) बीटेक करतोय. तर औरंगाबादचा शुभम चव्हाण मॅकेनिकल इंजिनिअर (Mechanical Engineer) आहे. दुर्गेश छानवाला हा तरुण एका मोठ्या खासगी कॉलेजमधून एमबीए करतोय.

 

या सर्व तरुणांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी हवीय. नोकरीत स्थिरता हवी या उद्देशाने हे सर्व तरुण कुटुंबियांच्या आग्रहास्तव पोलीस शिपाई भरतीसाठी आले आहेत. पोलिसांनी उच्च शिक्षित तरुणांचा एक डेटा तयार केला असून तो पाहून तर यांनाही शिपाई बनायचे आहे का, असा प्रश्न पडतोय.

 

ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांचाही भडीमार आहे, या सगळ्यांना शिपाई व्हायचं आहे. पोलीस भरती सुरू झाली. मात्र यावेळेस इतके उच्चशिक्षित उमेदवार पाहून अधिकाऱ्यांनाही धक्का बसलाय, हे उच्चशिक्षित उमेदवार जर पोलीस शिपाई बनण्यासाठी येताय तर आम्हालाही चांगले कर्मचारी मिळतील, असं औरंगाबादच्या पोलीस अधीक्षकांचं म्हणणं आहे.

 

 

पोलीस भरतीसाठी उच्चशिक्षित उमेदवारांची असलेली ही गर्दी विचार करायला लावणारी आहे. सरकारी नोकरीत असणारे स्थैर्य आणि ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांना सरकारी नोकरी असली तर मुलगी चांगली मिळते आणि घरच्यांची सरकारी नोकर व्हावं ही इच्छा यामुळे हे सर्व तरुण इथं आले आहेत. यांनी घेतलेल्या उच्च शिक्षणाचा फायदा तो काय? कदाचित बेरोजगारीचे हे भीषण वास्तव तर नाही ना, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :