अहमदनगरचं नाव काय बदलता ? तरुणांना नोकर्‍या आणि रोजगार द्या ! खासदार ओवेसीचं वक्तव्य 

spot_img

अहमदनगरचं नाव काय बदलता ? तरुणांना नोकर्‍या आणि रोजगार द्या ! खासदार ओवेसीचं वक्तव्य

 

अहमदनगर शहराचं नामांतर करण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. या शहराचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे करावे, अशी मागणी केली जात आहे. या मुद्द्यावर एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवैसी यांनी प्रतिक्रिया दिलीय.

 

 

अहमदनगर शहराचं नाव बदलण्याऐवजी या शहरातल्या तरुणांना नोकर्‍या द्या, रोजगार द्या. आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत ढासळत आहेत. पेट्रोलच्या किंमती वाढल्या आहेत. गॅस सिलिंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. तुम्हाला फक्त नावांची काळजी लागली आहे. कामाची काळजी करायला हवीय.

 

 

 

निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनांचं काय झालं, असा सवाल उपस्थित करत ओवेसी म्हणाले, सरकार चालवण्यात अपयश येत असल्यामुळे हे मुद्दे बाहेर काढले जात आहेत. ओवैसी यांनी वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे गट यांच्यात होणाऱ्या युतीवरही भाष्य केलंय.

 

 

प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे यांच्याशी युती करत आहेत, हा सर्वस्वी त्यांचा निर्णय आहे.

आम्ही जेव्हा त्यांच्यासोबत होतो, तेव्हा वंचित समाजाचा विकास व्हावा हाच, आमचा उद्देश होता. देशातल्या वंचितांचे शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सशक्तीकरण हवे असेल तर अगोदर त्यांचे राजकीय सशक्तीकरण होणे गरजेचे आहे.

 

प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरेंसोबत गेले असतील तर मी काय म्हणू शकतो, अशी प्रतिक्रिया असदुद्दीन ओवैसी यांनी दिली. दरम्यान, त्यांनी लव्ह जिहादच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. लव्ह आणि जिहाद हे कधीच सोबत येऊ शकत नाहीत. प्रेम ही संकल्पना पूर्णत: वेगळी आहे. तर जिहाद हादेखील वेगळा आहे. तलवार उचलून कोणालाही मारुन टाकणं, म्हणजेच जिहाद असल्याचा समज आहे. मात्र ते चुकीचे आहे.

 

 

भारतात १८ वर्षे झालेल्या व्यक्तीला तिच्या आवडीनुसार लग्न करण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्ती आपल्या मनाने जोडीदार निवडून लग्न करत असेल, तर कोणालाही त्याबाबत आक्षेप नसावा. ज्या-ज्या राज्यात लव्ह जिहादचा कायदा करण्यात आला, ते सर्व कायदे असंवैधानिक असल्याचं न्यायालयानं सांगितल्या औवैसी म्हणाले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :